
Sangli Crop Damage Panchanama : जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यात परतीच्या पावसामुळे पिकांचे नुकसान (Crop Damage) झाले. बाधित पिकांचे पंचनामे संबंधित विभागाने पूर्ण केले असून त्याचा अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे सादर केला आहे.
आता पाच महिने झाले तरी, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अद्याप मदत (Help) मिळाली नाही. त्यामुळे मदत कधी मिळणार, असा सवाल जिल्ह्यातील शेतकरी उपस्थित करत आहेत.
जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यात परतीच्या पावसाने हजेरी लावली. पावसामुळे वाळवा, पलूस, कडेगाव, आटपाडी, जत, कवठे महांकाळ, तासगाव, खानापूर, मिरज या नऊ तालुक्यांतील पिकांचे नुकसान झाले.
या तालुक्यांतील ४५ हजार ८६८ शेतकऱ्यांचे २१ हजार ८८७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. पंधरा ते वीस दिवसांपूर्वी सर्व पंचनामे पूर्ण झाले.
संबंधित विभागाने पंचनामे पूर्ण करून त्याचा अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे सादर केला आहे. २१ हजार ८८७ हेक्टरवरील पिकांसाठी शासनाच्या मदतीच्या आदेशानुसार ४२ कोटी २५ लाख रुपयांची मागणी केली आहे;
मात्र, पाच महिन्यांचा कालावधी झाला असून मदत अद्याप शेतकऱ्यांना मिळालेली नाही. लोकप्रतिनिधींनी याकडेही दुर्लक्ष केले असल्याचे चित्र आहे.
वास्तविक पंचनामे वेळेत झाले, संबंधित विभागाने अहवाल तयार करून वरिष्ठ विभागाकडे पाठवण्यात आला आहे; मात्र, आता मदत कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे;
मात्र, जिल्हा प्रशासनाने भरपाई मिळण्यासाठी पाठपुरावा करून लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी करू लागले आहेत.
ऑक्टोबरमध्ये पावसामुळे पीक नुकसानीची स्थिती
शेतकरी - संख्या क्षेत्र (हेक्टर) - रक्कम
जिरायत पिके
२८४९४ - १४२७९.६२ - १९ कोटी ४२ लाख
बागायत पिके
११९४६ - ५०७४.४९ - १३ कोटी ७१ लाख
फळ पिके
५४२८ - २५३३.२४ - ९ कोटी ११ लाख
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.