World Water Day : २२ मार्चला जागतिक जल दिन का साजरा करतात?

‘थेंब थेंब वाचवा पाण्याचा, हाच मार्ग आहे सुखी भविष्याचा’ हे ब्रीद घेऊन पाण्याला वाचवा तेच तुमचं जीवन वाचवेल.
Water
WaterAgrowon

दुशांत निमकर

पाणी (Water) हे जीवन आहे हे जरी त्रिकालाबाधित सत्य असलं तरीही आज घडीला जगात पाण्यासाठी हाहाकार माजला आहे. आफ्रिकेतील केपटाऊन सारखी शहरे शून्य पाण्याची शहरे बनली आहेत. काही वर्षांपूर्वी लातुरात रेल्वेने पाणी पोहोचवावे लागले, अशी बिकट परिस्थिती पाण्यासाठी होत असेल तर भांडणे, दंगली होतीलच.

म्हणून पाणी जपून वापरा तेव्हाच भविष्यकाळ सुकर होईल. पाण्याचे महत्त्व ओळखून मनुष्य नदीकिनारी राहू लागला. त्यामुळे 'सिंधू संस्कृती' उदयास आली तसेच लंडन शहर थेंम्स नदीच्या काठावर, दिल्ली शहर यमुना नदीच्या तर मुंबई अरबी समुद्राच्या काठावर वसले आहे.

पाणी ही मानवाची जैविक गरज असून सध्या तरी आपल्याच ग्रहावर वापरण्यायोग्य पाणी आहे. शिवकाळातील पाणी बचतीच्या उपाययोजना शासनाने करावेच अन्यथा दैनंदिन जीवनात ठरावीक लिटर पाणी उपलब्ध करून दिल्यास योग्य वापर, नियोजन व वितरण होईल कारण पाणी हेच जीवन असून ‘वैश्विक द्रावक’ आहे.

‘पाणी रे पाणी तेरा रंग कैसा, जिसमे मिलाओ लगे उस जैसा’ अत्यंत महत्वाचा स्रोत असल्याने पाणी वाचवा, जीवन वाचवा म्हणावे लागेल.

Water
World Water Day : जागतिक जलदिनाचं महत्व काय?

औद्योगिक विकास, शहरीकरण, लोकसंख्यावाढ यामुळे मनुष्य स्वकेंद्रित झाला आहे. स्वैराचार अधिक वाढल्याने नैतिक मूल्याचा ऱ्हास होत आहेच. त्यात पाण्याचा अपव्यय केल्यास पाण्याची समस्या निर्माण होऊन पाण्यासाठी तिसरे महायुद्ध होण्याची भविष्यवाणी बुतरस घाली यांनी केली होती.

ती शक्यता नाकारता येत नाही म्हणून संयुक्त राष्ट्राने पाण्याचे महत्त्व कळावे, जलसंवर्धन व्हावे, जागरूकता निर्माण व्हावी यासाठी २२ मार्च हा दिवस 'जागतिक जल दिन' म्हणून साजरा होतो.

‘थेंब थेंब वाचवा पाण्याचा, हाच मार्ग आहे सुखी भविष्याचा’ हे ब्रीद घेऊन पाण्याला वाचवा तेच तुमचं जीवन वाचवेल. पाण्याची बचत म्हणजे पाण्याची निर्मितीच हे इस्राईल देशाकडून शिकण्यासारखं आहे.

भूजल पातळी वाढविण्यासाठी ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ ही मोहीम राबवावी. ‘पाण्याविना माणसाचा जीवन आहे व्यर्थ, पाणीच देते जगण्याला अर्थ’ ही लोकचळवळ चालावी यासाठी जलदिनी पाणी काटकसरीने वापरण्याची शपथ घ्यावी.

Water
Tanker water supply : गावपाड्यात टॅंकरने पाणीपुरवठा

वर्षभर पाणी बचतीचे नानाविध उपक्रम घेऊन नागरिकांना जागृत करावेच लागेल आणि शेतीसाठी पाणी वापरताना पाणी अडवा, हरितक्रांती घडवा यासाठी पाण्याचे सुव्यवस्थापन करून ठिबक सिंचनाची किमया न्यारी, कमी पाण्यात उत्पन्न भारी’ ही संकल्पना बळीराजाने अंगीकारायला पाहिजे कारण पाणी हेच निसर्गाचे अनमोल रत्न असून सर्वांनी पाणी वाचविण्याचा प्रयत्न करावा तेव्हाच 'जल हेच जीवन' असल्याचा साक्षात्कार होईल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com