Team Agrowon
सांगली जिल्ह्यात यंदा द्राक्ष पिकाला नैसर्गिक आपत्तीचा फटका बसलेला नाही.
त्यामुळे द्राक्ष निर्यातीला शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
जिल्ह्यातून आज अखेर द्राक्षाची निर्यात ९ हजार ३६१ टन झाली आहे.
गेल्यावर्षीपेक्षा यंदा द्राक्षाची निर्यातीत वाढ होईल, असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.
युरोपसह आखाती देशात द्राक्षाची निर्यात मोठ्या प्रमाणात होत असल्याचे चित्र आहे.
तासगाव, खानापूर या दोन्ही तालुक्यांतील शेतकरी द्राक्षाची निर्यात करण्यासाठी पुढे येत आहेत.
यंदाच्या हंगामात जिल्ह्यातून द्राक्षाची निर्यात वाढवण्यासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांमध्ये जागृती केली असून यंदाच्या हंगामात ९ हजार ५१५ शेतकरी द्राक्षाची निर्यात करत आहेत.