Team Agrowon
येत्या काळात द्राक्ष निर्यातीस गती येईल. यंदाच्या हंगामात जिल्ह्यातून द्राक्ष निर्यात करण्यासाठी शेतकरी पुढे आले असल्याने निर्यातही वाढेल.
सध्या जिल्ह्यातून आखाती देशात २० कंटेनर म्हणजे ३१६ टन इतकी द्राक्षाची निर्यात झाली आहे.
राज्यातून ६८४ टन इतक्या द्राक्षाची निर्यात झाली आहे. जिल्ह्यातून जानेवारीच्या अखेरपासून युरोप देशात द्राक्षाची निर्यात सुरू होईल, अशी माहिती कृषी विभागाने दिली आहे.
यंदा हंगाम उशिरा सुरू झाला असला तरी, द्राक्षाची निर्यातीला विलंब झाला आहे.
राज्यातील ४० हजार ९४५ शेतकऱ्यांनी द्राक्ष निर्यातीसाठी नोंदणी केली आहे.
जिल्ह्यातून यंदाच्या हंगामात द्राक्ष निर्यातीसाठी शेतकऱ्यांची नोंदणी अधिक होण्यासाठी कृषी विभागाने पुढाकार घेतला आहे.