Team Agrowon
आंतरराष्ट्रीय बाजारात सोयातेलाचे दर ३५ टक्क्यांनी कमी झाल्यानंतर देशात आयातीचा लोंढा आला.
देशात सोयातेलाचे साठे पडून आहेत. त्यामुळं चालू हंगामात सोयाबीन गाळपातून मिळणाऱ्या सोयातेलाला उठाव मिळत नाही.
सोयातेलसह खाद्यतेलाच्या आयातशुल्कात वाढ करण्याची मागणी शेतकरी आणि उद्योग करत आहेत.
पण केंद्र सरकार या मागणीकडे दुर्लक्ष करत आहे.
देशात ऑक्टोबर महिन्यात सोयाबीनची आवक सुरु झाल्यानंतर नोव्हेंबरपासून सोयातेलाचे दर दबावात येत गेले.
इंडोनेशियानं पामतेल तसचं रशिया आणि युक्रेननं सूर्यफूल तेल निर्यात वाढवल्याचा आंतरराष्ट्रीय बाजारावर दबाव होता.
सोयातेलाचे दर आता ३५ टक्क्यांपर्यंत कमी झाले.
त्यातच सरकारनं आयातशुल्क आधीच कमी केल्यानं देशात खाद्यतेल आयातीचा लोंढाच आला.