
Washim News : जिल्ह्यात दोन दिवस आलेला अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतातील पिकांचे तातडीने पंचनामे (Panchnama) करण्याचे निर्देश पालकमंत्री संजय राठोड (Minister Sanjay Rathod) यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.
जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांच्याशी भ्रमणध्वनीवरून चर्चा करीत वादळी पाऊस व गारपिटीने झालेल्या नुकसानीची माहिती घेतली.
कोणताही नुकसानग्रस्त शेतकरी नुकसानीच्या मदतीपासून वंचित राहणार नाही, यासाठी काळजीपूर्वक नुकसानीचे पंचनामे करण्यात यावे, असे सूचवले.
षण्मुगराजन म्हणाले, की सर्व तहसीलदारांना नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे निर्देश दिले आहेत. जिल्ह्यात वादळी पाऊस झाला असून वादळी वारेही वाहिले. मालेगाव, मंगरुळपीर तालुक्यांत काही भागात गारपीट झाली.
सर्व तहसीलदारांना गारपीट व वादळी पावसाने बधित क्षेत्रास व्यक्तीशः भेट देण्याच्या सूचना दिल्या आहेत.
बाधित क्षेत्राचे मंडल अधिकारी, तलाठी, कृषी सहायक यांच्या मदतीने तातडीने पंचनामे आणि सर्वेक्षण करून पीक नुकसानीचा अहवाल त्वरित सादर करण्याचे निर्देश दिल्याचे षण्मुगराजन यांनी पालकमंत्र्यांना सांगितले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.