
Agriculture Market News ाजापूर, जि. रत्नागिरी ः तालुक्यातील शेतकऱ्यांनी खरेदी-विक्री संघाकडे यावर्षी २ हजार ८३६ क्विंटल भात (Paddy) दिला. भात खरेदीच्या (Paddy Procurement) माध्यमातून यावर्षी ५७ लाख ८५ हजार ४४० रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती राजापूर खरेदी-विक्री संघाचे व्यवस्थापक दीपक कानविंदे यांनी दिली. हा मोबदला शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाल्याचेही त्यांनी सांगितले.
लहरी पाऊस, मनुष्यबळाची कमतरता, मजुरी आणि यांत्रिक साधनांचे वाढते दर आदींमुळे भातशेती तोट्यात असल्याचे बोलले जाते. पावसाळी हंगामामध्ये राबूनही त्या तुलनेमध्ये उत्पन्न मिळत नसल्याने अनेकांचा भातशेतीकडे कल कमी झाला आहे.
त्यातून, यापूर्वी हिरवेगार असलेले भातशेतीचे मळे अलीकडे पडीक असल्याचे चित्र दिसत आहे. भातशेतीतून अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी भातशेती बंद करून रेशन दुकान तसेच बाजारपेठेतून तांदूळ खरेदीला प्राधान्य दिले आहे. अशा स्थितीतही काही शेतकरी आजही भातशेती करतानाचे आश्वासक चित्र आहे.
दृष्टिक्षेपात भातखरेदी
केंद्र शेतकरी संख्या भातखरेदी (क्विंटल) रक्कम
राजापूर ४२ १२६५.६० २५,८१,८२४
पाचल ६७ १५७०.४० ३२,०३,६१६
एकूण १०९ २८३६ ५७,८५,४४०
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.