Weather Update : लहरी वातावरणामुळे बोर्डीतील शेतकरी चिंतेत

वातावरणात प्रचंड उष्णता, ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट आणि हलका पाऊस सुरू झाल्यामुळे आंबा, चिकू, मिरची उत्पादकांत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
Weather Update
Weather UpdateAgrowon

बोर्डी, जि. रायगड : परिसरात बुधवारी (ता. १९) सकाळी वातावरणात प्रचंड उष्णता, ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट आणि हलका पाऊस सुरू झाल्यामुळे आंबा, चिकू, मिरची उत्पादकांत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

सुमारे तासभर चाललेल्या या निसर्गाच्या लहरीपणामुळे आंबा बागायतरांच्या तोंडचे पाणीच पळाले होते; मात्र तासाभरात सूर्यदर्शन झाल्याने शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला; परंतु दीड तासाच्या कालावधीनंतर पुन्हा अकरा वाजण्याच्या सुमारास ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट सुरू झाला.

Weather Update
Weather Update : हवामान अंदाजाची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवावी

गेल्या काही दिवसांपासून बोर्डी भागातील वातावरण संतुलन पूर्णपणे बिघडले आहे. सतत ढगाळ वातावरण राहिल्याने पिकांवर प्रचंड परिणाम झाला आहे. आंब्याची गळती होत आहे; तर मिरचीच्या उत्पादनात घट झाली आहे.

बाजारपेठेत चिकूच्या फळाला मागणी घटल्याने झाडांवरील चिकू फळे पिकून गळून जाऊ लागली आहेत. अशा परिस्थितीत निसर्गाचे हे चक्र फिरू लागल्यामुळे बोर्डी परिसरातील शेतकऱ्यांवरती आर्थिक संकट घोंगावत आहे.

केवळ पंचनामे

दोन महिन्यांपासून शेतकरी हलाखीच्या परिस्थितीत मार्गक्रमण करीत आहे. होळीच्या दरम्यान झालेला अवकाळीमुळे नुकसानीचे फक्त पंचानामे झाले; मात्र नुकसान भरपाईबाबत शासनाने कुठलाही प्रकारचा ठोस निर्णय घेतलेला नाही. अशा परिस्थितीत पुढील वाटचाल कशी करावी, या विवंचनेत शेतकरी पडला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com